निळं गुलाब !!!

निळं गुलाब !!!

Monday, 16 January 2012

बड़ी मुश्किल से दुनिया में दोस्त मिलते है!!!!

दिए जलते है, फुल खिलते है
बड़ी मुश्किल से मगर, दुनिया में दोस्त मिलते है

जब जिस वक्त किसी का, यार जुदा होता है
कुछ ना पूछो यारो दिल का, हाल बुरा होता है
दिल पे यादों के जैसे तीर चलते है

इस रंगरूप पे देखो, हरगीज नाज ना करना
जान भी मांगे यार तो दे देना, नाराज ना करना
रंग उड़ जाते है, धुप ढलते है

दौलत और जवानी, इक दिन खो जाती है
सच कहता हूँ, सारी दुनिया दुश्मन हो जाती है
उमरभर दोस्त लेकिन साथ चलते है

.......चित्रपट : नमक हलाल, गीत : आंनद बक्षी, संगीत : आर डी बर्मन, पार्श्वगायन : किशोर कुमार


हे माझं खूप आवडते गाणं आहे. अर्थात ते सगळ्यांच्याच असेल यात काहीही शंका नाही पण मी अतीशय प्रेमात आहे ते त्यातील शब्दांच्या. मैत्री बद्दल इतक्या सोप्या आणि सरळ शब्दात बक्षी साहेबच लिहू शकतात. मैत्री हे एकमेव नाते असे आहे ज्याला कशाचीच जोड नसते म्हणजे काल वेळ, वय, रंग, रुप ,गरीब श्रीमंती .....काहीही सोबत नसले तरी सूर्यासारखी तळपणारी मैत्रीच. मैत्रीबद्दल खुप काही लिहिले जाते. बोलले जाते ...लेख, कविता, चारोळी, सिनेमातली गाणी ...सगळे मैत्रीबद्दल एवढे काही बोलून गेलेत कि माझा साठी काही लिहायला शिल्लक ठेवलेले नाहीये.... या गाण्यातच मैत्रीबद्दल च्या सगळ्या भावना अक्षरश: शब्दात मांडल्यात ..... म्हणून मी माझा सगळ्या मित्र मैत्रीणीना हे गाणच समर्पित करते!!!

Wednesday, 4 January 2012

कोकणची माणसं साधी भोळी .... काळजात त्यांच्या भरली शहाळी.....!!


मी स्वतः कोकणातली.... सिंधुदुर्ग जिल्ह्यातली .... कोकणातला निसर्ग, समुद्र, पायवाटा, मालवणी जेवण, ती भाषा ...आहा हा ... काय काय सांगायचं ? ... सगऴं सगऴं अगदी भारावून टाकणारे आहे... "येवा कोकण आपलोच आसा " असे म्हणत स्वागत करणारी कोकणी माणसं! त्यामुळे अर्थातच मला कोकणात जन्मल्याचा अभिमान आहे. मुंबईत स्थायिक असल्यामुळे गावी जायचा योग तसा कधीतरीच .... पण मुंबईत सुद्धा आजूबाजूला इतके कोकणी शेजारी आहेत कि कोकणातली कमतरता मला तरी मुंबईत भासली नाही ..आता निसर्ग नाहीये तसा पण माणस अगदी कोकणातली !!!

कोकणची माणसं साधी भोळी .... काळजात त्यांच्या भरली शहाळी.... हे गाणं मी लहानपणा पासून ऐकतेय तेव्हा मला आपल्या माणसांबद्दल एवढे छान छान गाणं केलय म्हणून आनंद व्ह्यायचा तरीही .....याचा अर्थ मला अजून उलगलेला नाहीये .... ते म्हणजे कोकणची माणसं तीहि साधी भोळी ??? ये बात कुछ हजम नाही हुई .. तसं साधी माणसं सगळीकडेच असतात पण काळजात त्यांच्या भरली शहाळी....हे जरा अति होतंय आता .. मी जेवढ्या कोकणी माणसाना भेटलेय त्यावरून तरी कोकणी लोक हे अतिशय चलाख आणि चतुर असतात ... म्हणजे कुणाची बिशाद असेल जर का एखाद्या कोकणी माणसाला टोपी लावाल ? भांडण्यात १ नंबर अट्टल ... कोकणी शिव्या ऐकलात का कधी ? आता ते "आवाशीचो घो ..... " वैगरे सोडून अशा काही शिव्या हासडतील ..?? जर का ऐकाल तर मला असे वाटते कि सगळ्यात जास्त शिव्यांचा भांडार जर का कुणाकडे असेल तर आमच्या कोकणी माणसाकडे ....बोलायला तर अजिबात ऐकणार नाहीत ... जस काय सगळ्या जगाचं शहाणपण यांच्यातच भरलय ...भाषाच इतकी तगडी आहे कि समोरचा माणूस ऐकतानाच गार होऊन जाईल.!
शाळेत असताना गावातले काका, आज्जी, मावश्या अशी गोतावळ वरचेवर आमचा कडे असायची.... त्यांची ती उच्च स्वराची एकेरी भाषा ऐकताना वाटायचं कि हे लोक बोलताहेत कि भांडताहेत .... ? मानापमान ठासून भरलेली ..... लग्नात, सुतकात यांना कळवले नाही तर तुमची काही खैर नाही. १०० वर्षा पूर्वीच्या गोष्टी सुद्धा अगदी अगदी लक्षात ठेवतील आणि उकरून काढतील... कधी ? त्याचा काही नेम नाही ........यांनी बोललेली गोष्ट म्हणजे काळ्या दगडावरची रेख ..सगळ्यात अवघड गोष्ट असते यांचा साठी ती म्हणजे माफी मागणे .... स्वतःची कितीही चूक असली तरी ... मोडेन पण वाकणार नाही असा पावित्रा असलेली लोक म्हणजे कोकणी माणसं!

फार झालं हा ? एवढी पण काही वाईट नाहीयेत हा आमची कोकणी माणसं... शेवटी चांगली वाईट लोक प्रत्येक भागात असतात नाही का ? ....मी कोकणी माणसाना जेवढ जवळून पाहिलंय त्यावरून तरी मला या लोकांचा अभिमान आहे..... "अतिथी देवो भव:" म्हणजे काय ?? ते या लोकांकडून शिकायला पाहिजे ....स्वतः उपाशी राहतील पण दुसर्याला पोट फुटे पर्यत खायला घालतील .... आपल्या कडे असलेली कोणतीही गोष्ट त्यांच्या घरच्या लोकांना नंतर कळेल पण सगळ्यात आधी शेजारच्या घरी माहित असते ....किंवा घरात एखादा नवीन बनवलेला पदार्थ शेजार्यांचा घरी आधी पोहोचलेला असेल.. मग शेजार्यांकडून समजते कि आपल्या घरात काय शिजलंय ते..
इंग्रजीतले ...YOu म्हणजे आपल्या मराठीत तू, तुम्ही , तुम्हाला पण आमचा कोकणात "तुका" म्हणे ....मग तो ५ वर्ष पासून ते ५० वर्ष पर्यंत कोणीही असो ...एकेरीतच ... जास्त tension घेव्क नको ... :D

खूप काही लिहिण्यासारखे आहे पण मी इथेच थांबते नाहीतर कोकणी माणसांनी हे सगळे वाचले ना तर ....माका तोंड दाखवूक जागा ठ्येव्ची न्हाय ....
.

Friday, 23 December 2011

मूर्ती पूजा ????

स्वामी विवेकानंदाची देशभर नव्हे तर जगभर ख्याती होती. त्यांची शिकवण, विचारांची, बुद्धिमत्तेची जगभर भुरळ होती. त्या काळी स्वामी देशभर भ्रमण करायचे. आपले विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे. त्यांच्या बुद्दीमत्तेची तशी सगळ्यांनाच प्रचीती आली होती. जसे त्यांचे अनुयायी होते तसेच त्यांचा तिरस्कार करणारे लोक हि होते.
असेच एकदा एका राज्यात स्वामी येणार अशी बातमी त्या राज्यातील एका राजाला लागली. स्वामी येणार म्हणून राजा तयारीनिशी स्वामींना कोंडीत पकडायचे ठरवले आणि काही असे प्रश्न विचारून त्यांची फजिती करायची ठरवली.
त्यांना भेटीस बोलावून त्यांना विचारलेला प्रश्न आणि स्वामी विवेकानंदानी बुद्धिमत्तेने दिले उत्तर .....


राजा : स्वामी, तुम्ही हिंदू धर्माचे एवढे अभ्यासक ! तुमचं धर्मा विषयी ज्ञान बघून माझा एका प्रश्नच उत्तर द्या कि "हिंदू धर्मात मूर्ती पूजा का करतात ??"
स्वामी : (थोडावेळ शांत बसून...त्यांचे लक्ष सहज भिंतीवरच्या चित्राकडे गेले .... भिंतीवर बोट दाखवत ) ती भिंतीवरची तसबीर कुणाची आहे ??
राजा : माझ्या वडिलांची.....
स्वामी : ती भिंतीवर लावण्याचे कारण ?
राजा : ते दिवंगत झाले असून, त्यांची आठवण सदा राहावी म्हणून काढलेल्या चित्राची तसबीर आहे ती ....
स्वामी : ती काढून द्याल ?
(राजा अचंबित ... त्याला समजत नव्हते कि स्वामी नक्की काय करताहेत ??... राजाने ती तस्वीर काढून स्वामींना देऊ केली.)
स्वामी : ती तस्वीर तुमचा हातात ठेवा ... आणि आता त्या तास्वीरीवर थुंका !
(तिथे असलेले सर्वजण अचंबित झाले, राजा तर रागाने लाल झाला )
राजा : स्वामी(ओरडून), हे तुम्ही काय बोलता आहात ? हि सामान्य तस्वीर नसून माझा दिवंगत वडिलांची तस्वीर आहे. त्यावर तुम्ही थुंकायला सांगता ??
स्वामी : (शांतपणे ) राजा, का नाही ? ती एक साधारारण शी कागदाची चौकट आहे आणि त्यावर असणारे चित्र हे खोटे आहे. त्यात तुमची खरेखुरे वडील नाहीत मग त्यावर थुंका ...
राजा : नाही , ते चित्र खोटे असले तरी माझा वडिलांची छबी त्यात आहे ती माझासाठी सामान्य चौकट कशी असू शकते?
स्वामी : (किंचित हसून ) राजा, मूर्ती पूजेच उत्तर तुम्हीच तुमचा तोंडून दिले..आता मी तुम्हाला वेगळे काय सांगणार ....? ज्या भक्तांनी आपल्या भगवंताला कधीही पहिले नाही अशा "भगवंताची" छबी जेव्हा भक्तीने एका दगडात उतरवली गेली त्याला आपल्या मनातील 'मानवी' रूप देऊन जर त्याची पूजा केली तर काय अयोग्य आहे? ती एक सामान्य मूर्ती नसून आपल्या श्रद्धेने दगडाला देवत्व प्राप्त करून दिले आहे ...राजा, हे तुम्हालाही माहित आहेत कि त्या तास्वीरीत तुमचे वडील नाहीत पण त्यांच्यावरची असणारी श्रद्धा तुम्हाला सांगतेय कि त्या तास्वीरीत "ते" आहेत मग एका निर्जीव दगडात देव असणे योग्यच नाही का ?
(स्वामीच्या उत्तराने .... राजाला नक्कीच चोख उत्तर मिळाले असेल अशी आपण आशा ठेऊया )

Thursday, 22 December 2011

सहल एक भ्रमण .....कि पिकनिक ?

परवाच आमचा ऑफिसची पिकनिक गेली होती ...कुठे ??? कुठे काय risort वर......भटकंतीचा आभाव असलेली ......पिक-निक !!!!

पिकनिक म्हणजे मौज मज्जा, फिरणं, धिंगाणा ......अजून खूप काही .... जे शब्दात सांगणे कठीणच .... रोजच्या सगळ्या गोष्टी मागे सोडून एका वेगळ्या जगात प्रवेश असतो...एक वेगळाच सुखद अनुभव...रोज हवा हवासा वाटणारा .....
शाळेत असताना पु.ल.चं प्रवास वर्णन वाचून त्या पुस्तकी प्रवासात रंगून जायचो ....वाटायचं कि आपणच तो प्रवास करतोय..बोटीत बसतोय, निसर्ग न्याहाळतोय, मौलो मैल पायी चालतोय तरी वाट सापडत नाहीये ...वाटेत मिळणारे अनुभव, माणस, वाटा, निसर्ग ...जणू तिथेचं प्रत्यक्षात असल्याचा ....भास ..... अनुभव.... वेगळाच ...(म्हणूनच कि काय .... मराठी मनाचे इतके लाडके आहेत आपले ....."पु. ल.")
पिकनिक म्हंटले कि मला शाळेतली "सहल" आठवते ...ती शाळकरी "सहल" अगदी शिष्ठचारी असायची इथेच जायचं नाही तिथे नको .. मोठी माणसे अगदी मानगुटीवर बसलेली असायची. ..राग राग यायचा त्या शाळेतल्या बाईंचा आणि गुरुजींचा... (पण आता समजतेय कि तेव्हा शाळेतल्या एवढ्या मुलांना जबाबदारीने घेऊन जाणे महाकठीण काम) ....आईने दिलेली ती छोटीशी waterbag त्यात खाऊचा डब्बा ...आणि आणि जोडीला हात पकडून असलेली आपली बाल मैत्रीण (जी अगदी आपली खास असायची ...हो तीच ..) .... "मित्र - मैत्रिणीचा हात घट्ट पकडून ठेवायचा....रांगेत चालायचे" अशी बाईंची सूचना .... आणि २-२ अशा जोड्या करून सगळे अगदी रांगेत निघायचो ........ मुंबईत बरीच अशी ठिकाण आहेत जी मी शाळेतल्या पिकनिक मध्ये पहिलीत आणि मला जशीच तशी आठवणीत आहेत..म्हातारीचा बूट, सिमेंट चे विमान, नॅशनल पार्क मधले प्राणी..बगळ्यांची तळ्यातली रांग ... .सगळ्याच अगदी अप्रूप वाटायचं..... खायला खाऊ म्हणून सर्रास आम्हाला शाळेत भेळ दिली जायची .. अगदी ठरलेली ....मग आम्ही सगळे गोलाकार बसून जमिनीवर पाडत , तोंड भर शेव पसरवत भेळ खायचो ....आणि संध्याकाळी निमुटपणे घरी परतायचो ...घरी सहलीची गम्मत सांगायला ....
कॉलेज नंतर सहली चे स्वरूप पार बदलून गेलं .........आता कुठे खरेखुरे जग पाहायला सुरवात केली होती...इतिहास खर्या अर्थाने उलगडायचा असेल तर पूर्ण भारत पालथा घालावा लागेल .... अस म्हणतात कि आपला संपूर्ण जन्म जरी खर्च केला तरी पूर्ण भारत दर्शन होऊ शकत नाही (मग परदेश वारी सोडूनच द्या) ...आणि किती खरय हे बघा ना .....आपण सुद्धा शिक्षणा नंतर नोकरी, घर आणि अशा व्यस्त जीवनात भटकंती म्हणजे वेळ, प्रवास, होणारा खर्च पाहता....आपल्यासाठी हे भ्रमण एक स्वप्नच होऊन राहिले आहे.म्हणजे या जन्मी भारत जन्म जवळ जवळ अशक्यच ... पण तरीही एखादा दिवस विरंगुळा म्हणून पिकनिक करायला आणि वर्षातून एकदा स्वप्न पाहायला ....काय हरकत आहे नाही का ?? मग आपण सुद्धा आपल्या स्वप्नांची वाट बदललीय आता .... पिकनिक चे स्वरूप आता resort मध्ये झालेय...जो-तो resort मध्ये जात असतो ....एखादा छानसा रीसॉर्ट बघून तिथेच ताणून द्यायचं ...खाऊन पिऊन दिवसभर लोळत पडायचं ... तिथल्या तिथे जगायचं अगदी .... यात काही मज्जा आहे का ?? ... या गोष्टी आपण रविवारीही घरी करत असतोचं ना ? मग त्या साठी अस रीसॉर्ट वर जाऊन पैसे उधळणे मला जरा पटतच नाही.... जी भटकण्यात मजा असते ती resort मधे कसली आलीय ?
एकूण काय जिथे मन रमत नाही ती कसली आलीय पिकनिक हो ...म्हणून ऑफिस ची पिकनिक अगदीच रट्याळ वाटली ....

Saturday, 17 December 2011

रिंगा रिंगा ...............


मराठीत पाहिलेला दमदार सिनेमा. दमदार यासाठी कारण या आधी रोमांचित चित्रपट बरेच पाहिलेत हिंदीत ...पण ते रोमांचित वैगरे असे कधी वाटलेच नाहीत. कथानक फक्त फिरवून फिरवून दाखवत असतात... म्हणजे सरता शेवट त्या रोमांचकतेचा भुगा झालेला असतो.....म्हणजे आमचं रिंगा रिंगा झालेलं असते.

रिंगा रिंगा .... २०१० मध्ये प्रदर्शित झालेला सिनेमा मी कालच पहिला .... उशिरा पहिला याचं दुख: नाही पण चांगला सिनेमा पहिला याचा आनंद आहे ...
एक वेगळा व छान प्रयत्न ... मराठीत प्रयत्न सफल होत नाहीत असे मी ऐकलय कारण प्रेक्षक वर्ग फारच कमी आहे...आणि फारच कमी मराठी लोक थेटरात जाऊन सिनेमे बघतात .... जसे मीच बघा ना.. हा सिनेमा २ वर्ष नंतर पहिला... असो..सांगायचा मुद्दा असा कि मला हा सिनेमा अतिशय आवडला... सोनाली कुलकर्णी, अजिंक्य देव, भरत जाधव, उदय सबनीस, अंकुश चौधरी आणि संतोष जुवेकर असे दमदार कलाकार घेऊन एक रोमांचित आणि रहस्यमय सिनेमाच दिग्दर्शन केलंय संतोष जाधव याने..... हि गोष्ट गोव्यातल्या राजकरणाची आणि एका राजकारण्याची ...जो खुर्ची साठी खून सुद्धा पडायला मागे राहत नाहीत असा राजकारणी....ज्याला अजिंक्य देव ने आपल्या भूमिकेने मस्त न्याय दिलाय पहिल्यांदा त्याने खलनायकी भूमिका केली असावी, आणि या चित्रपटाची जान जर कोणी असेल तर ती आहे सोनाली कुलकर्णी ..... उत्तम अभिनय ..... खऱ्या अर्थाने या सिनेमाच नाव रिंगा रिंगा ठेवलय .. कथानक अतिशय चतुराईने फिरवलंय कि तुम्हाला सगळा सिनेमा फिरून फिरून आठवायला भाग पाडते ... अतिशय सुंदर मांडणी, सुंदर अभिनय, कर्णमधूर गाणी .अजून मी काय सांगू ?? सांगण्यात मजा नाही बघण्यात मजा आहे ... पण तो जरूर बघा (बघितला नसेल तर ...)

Friday, 16 December 2011

जिंदा है हमीसे नाम प्यार का ....

.....मी आणि माझी मैत्रीण बारावीचा परीक्षेला जात होतो. परीक्षा तशी इतकी महत्वाची नव्हती पण होती. ती परीक्षा क्लास ची होती 'म्हणून' तितकीशी महत्वाची नव्हती पण शेवटी परीक्षाच ती. ईकोचा पेपर होता. परीक्षा क्लास ची असल्यामुळे ती दुपारी ४ वाजता होती. क्लास तसा घरापासून थोडा लांब होता. रोजच्या जाण्यायेण्या मुळे तितकासा लांब वाटत नव्हता एवढच पण १५ - २० मिनिटे जेमतेम लागत असतील पायी चालायला. पण झाले असे कि त्या दिवशी आम्ही बस ने जायचे ठरवले. तसा बस - ट्रेन वैगरे प्रवास या आधी मी कधी केलाच नव्हता. शाळा- कॉलेज जवळच असल्यामुळे मला अशा वाहनांचा उपयोग पडलाच नाही आणि गेलेच तर कधी आई बाबान सोबत पण एकटी दुकटी नाहीच. तसाच अनुभव माझा सोबत असलेल्या मैत्रिणीचा देखील (शेवटी माझीच मैत्रीण) बस नंबर विचारून वेळेच्या आधी पोहोचण्यासाठी ३.३० ला घरातून बाहेर पडलो आणि अगदी व्यवस्थित आम्ही बस मध्ये चढलो देखील. आईने बसमध्ये लागणारे तेवढेच पैसे हि दिले होते अजून Extra नव्हतेच आणि त्या वेळी बस ची तिकीट २-३ रुपये असावी २-3 stop साठी . आम्ही बसमध्ये बसून पेपरासाठी तयारी वाचन सुरु केले. पण बस कुठे चाललीय? आपल्याला कुठे उतरायचं ?? याचाशी आमचा काहीही संबंध नव्हता. मग सहज १० मिनिटांनी बाहेर लक्ष गेले तर रस्ता अनोळखी वाटला. म्हटले असेल ...बस नाहीतरी फिरून फिरून जाते ना ?? मग असेलही ...पुन्हा 'बिनधास्त' वाचन सुरु ... १५-२० मिनिटे झाली अजून stop आला नाही अस मला राहून राहून चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते (हे मला खरच वाटत होते बर का ...) . पण नंतर थोडे थोडे लक्षात यायला लागले होते कि आम्ही बस तर बरोबर नंबरची पकडलीय पण चुकीची पकडलीय... चुकीची याचा अर्थ विरुद्ध दिशेला जाणारी पकडलीय (म्हणजे जो बस stop सांगितला त्याचा समोरचा stop वरची बस पकडली जी नुकतीच आम्हाला जिथे जायचे तिथून जाऊन आली होती ) . ...धत तेरी कि ... आता मात्र आम्ही बस कंडक्टरला विचारलेच कि हि बस चाललीय कुठे ? (आता कुठे चालालीय ते माहित करून सुद्धा काही समजले नसते पण आम्ही विरुद्ध दिशेला जातोय हे स्पष्ट झाले ) मग बस तिकीट काढतानाच हे कंडक्टर ने सांगायला हवे होते असे हि आम्ही विचारले पण कसले काय उलट ते कंडक्टर साहेब जोक मारताहेत कि आज मुंबई फिरून घ्या म्हणे ... (इथे प्रसंग काय आणि बोलतात काय हे लोक ..) झाले ...... माझा मैत्रिणीने तिकडेच हंबरडा फोडला. मला सुद्धा त्या रस्त्याच ओ का ठो माहित नव्हता. (फक्त जिगरवाली गोष्ट अशी होती कि मी ढसाढसा रडायला सुरवात करत नाही.) पण आता मात्र दांडी गुल झाली होती रडण्याची अवस्था झाली होती पण रडत नव्हते हाच काय तो फरक, एकतर आम्ही कुठे होतो ते आम्हाला ठाऊक नव्हते आणि तिथून परत जाण्यासाठी आमच्याकडे पैसे हि नव्हते. माझा मैत्रिणीचे रडणे बघून मागचा सीट वर बसलेल्या माणसाला दया आली आणि बिचाऱ्याने पाकिटातले १० रुपये काढून माझा हातावर ठेवले आणि रिक्षा पकडून तुम्ही परत जा असे सांगितले. ( आता त्या १० रुपयात काय होणार म्हणा ?..पण ..ते खूप गरजेच होते .. ते नशिब !)
बस मधून उतरून आम्ही रस्त्याचा कडेला आलो. आणि बर्याच जणांना विचारल्या नंतर एका मुस्लीम रिक्षावाल्याला सांगितले कि आम्हाला आमचा क्लास पर्यंत पोहोचवा आम्ही कुठे होतो माहित नव्हते ( कुठे जायचे ते माहित होते) मग त्या रिक्षावाल्यला विनवणी केली कि आम्ही रस्ता चुकलोय. आम्हाला या या पत्यावर पोहोचावा ....पाहिजे तर १० रुपयाचा मीटर होई पर्यंत आस पास सोडा (म्हणजे निदान ओळखीचा रस्ता दिसला तर चालत जाऊ शकू असा विचार होता) मग त्या रिक्षावाल्याने आम्हाला आमच्या ओळखीच्या रस्त्याचे एकदाचे दर्शन दाखवले (या आधी मनात पाल चुकचुकत होती कि हा बरोबर पोहोचवेल ना ?? आणि आम्ही रस्ता चुकलो म्हणून कुठल्या कुठे घेऊन तर जाणार नाही ना ? असे ना ना प्रश्न मनात चालत होते) आम्ही मधेच उतरू असे सांगितले पण त्याने क्लास पर्यंत पोहोचवतो असे म्हणाला. आणि पोहोचवलेही ....आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे आमचा कडे असलेले १० रुपये त्याला देऊ केले तर त्याने साफ नकार दिला. त्याने ते पैसे घेतले नाही आणि म्हणाला कि तुम्ही परीक्षाला जा .....कसलाही विचार करण्याची मनस्थिती नव्हती पण एकच विचार तेव्हा मनात आला कि ...यालाच म्हणतात "माणुसकी" ...?? परीक्षा तितकीशी महत्वाची नव्हतीच पण या प्रसंगा मुळे मला त्या दिवशी २ देव माणसे भेटली ...तो बस मधला पैसे देणारा माणूस आणि तो रिक्षावाला !!!

Wednesday, 1 July 2009

लाइफ ............

Life : Life is a precious gift, so value and live it to the fullest

Every is a little life live it to its fullest

Its not what you see its how you see that matters

Life is like a mirror, smile at it

Life is an echo, give the best and get a great deal back

Example : Example isn’t the best way to teach it’s the only way

Smile : The world looks brighter from behind a smile.

Perception : All things are difficult before they are easy

Your Mind will give back exactly what you put in to it.

A misty morning does not singnify a cloudy day

Great Minds have purposes others have wishes

Laughter : Always laugh when you can, it is a cheap medicine.

Take time to laugh it is the music of the soul

Imagination : Its your imagination that can take you anywhere

Imagination is the highest kite one can fly.

Determination : The fulfillment of your dreams lies within you and you alone

Not in time, place, or circumstances, but in the man lies success.

For the resolute and determined there is time and opportunity

Love : Love is life and you miss love you miss life

A Loving heart is the beginning of all knowledge.

Opportunity : In the Middle of every difficulty lies an opportunity

Conviction : People support what they help create

Lessons : Big lessons of life are learnt from little mistakes

Teach : If you would thoroughly know any thing teach it to others

Attitude : The positive thinker creates a majority

Attitude is much more important than aptitude

Prosperity begins with a state of mind

The road to success is paved with good intensions

The Positive mind has extra problem solving power

Helpful : Doing nothing for others is the undoing of yourselves.

Humbleness : Soar high and keep your feet on the ground

Encouragement An achieved goal is the starting point for the future success.

Sharing : The giving of love is an education in itself

Worry : Worry is the misuse of the imagination

Success : Real Success puts all the players a head

All glory comes from daring to begin

Success doesn’t come to you, you go to it

Direction : A man without a purpose is like a ship without a rudder

Happiness : Every thing you need for a happy life is within yourselves

A cheerful heart does good like medicine

Participation : Participation is an achievement in itself

Advice : Many receive advice only the wise profit from it.

Action : Well done is better than well said

Tryout your ideas by visualizing them in action

Effort : In great attempts it is glorious event to fell

The harder you work, the luckier you get

Service : Our aim should be service not success

Winning : Winning isn’t every thing it’s the only thing

Thought : Take time to think is the source of power

Hard Work : Always do your best what you plant now you will harvest later

Initiation : Don’t wait for your ship to come in swim out to it

Listen : Every on should be quick to listen and slow to speak

Ability : Success is the Maximum utilization of the ability that you have

Not failure but low aim is a crime

We can not direct the win, but we can adjust the sails

Wisdom : Its not the situation its your reaction to the situation

Sharing : If you have knowledge let others light a candle at it

Patience : The ripest peach is highest on the tree.

Honesty : Honesty is the 1st chapter of the book of wisdom

Beauty : Every thing has its beauty but not every one sees it

Goodness : Goodness is the only investment that never fells

Faith : Anything the mind of mind can conceive and believe it can achieve