निळं गुलाब !!!

निळं गुलाब !!!

Wednesday, 23 April 2008

सागरा, प्राण तळमळला !

सागरा प्राण तळमळला !
ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! धृo
भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला ! १
शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला ! २
नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला ३
या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला ४
कवि - स्वा.वि. श्री. विनायक दामोदर सावरकर.


लहान असताना सावरकरांचा या कवितेचा अर्थ तसा मला समाजालाच नव्हता. फक्त सुंदर चाल आणि मंगेशकर कुटुंबाने गायले म्हणून हे गाणे फार आवडायचे. सतत गुणगुणत ओठावर रेंगाळायचे.. त्यातल्या बऱ्याच शब्दांचे उच्चार सुद्धा करता येत नव्हते. आणि पूर्ण गाणं लक्षात हि राहत नव्हते. तेव्हा कॉम्पुटर चे जग नव्हते मग अशी गाणी फक्त रेडिओ वर ऐकायला मिळायची, कधीतरी ....! कधी हे गाणे लागलेच कि या गाण्याबद्दल एकच गोष्ट सगळ्यांना माहित असायची ती म्हणजे कि हे गाणं मंगेशकर कुटुंबाने गायले म्हणून कदाचित "शब्द" माझा कडून दुर्लक्षित झाले असतील.
शाळेत एकदा "काळपाणी" पुस्तक वाचताना ज्या भावनांनी "ते" गाणं लिहिले त्याचा अर्थ समजायला लागला होता... का त्या सागराचा प्राण तळमळला असेल ते हि समजू लागले होते. हे एक गाणं नसून अथांग सागर सुद्धा कमी पडेल इतका तुडुंब भरलेल्या एका देशवेड्याच्या त्या "भावना" होत्या.
कसे काय एवढे छान छान शब्द सुचले असतील तेव्हा त्यांना ? काय भावना असतील ?असे सारखे वाटायचं.. पण हे अनुभवायला ते वेड हवे जे त्यांना कधीच लागले होते... असे देशासाठी "वेडे " लागलेले स्वातंत्र्यवीर बरेच होऊन गेले ... काही इतिहासाचा पानावर आलेहि नसतील पण जे आलेत तेच खरे "स्वतंत्रवीर" होते ....
हि कविता मी कधीही ऐकली कि माझा जीव तितकाच तळमळतो ज्या तळमळतेने त्यांनी लिहिले होते .... अशा देश वेड्या "स्वातंत्र्यवीरा" ला माझा मनाचा मुजरा !!!!!